भारताला ‘मोदी मेड डिजास्टर्स’मुळे त्रास; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली – देश आता महामंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचे आकडे अधिकृतपणे जाहीर झाले असून देशाचा विकास दर आता उणे 23.9 टक्के इतका झाला आहे. देशातील जीडीपी मध्ये झालेली ही घसरण अभुतपुर्व स्वरूपाची आहे. अशियातील अन्य देशांच्या तुलनेतही भारताची ही आर्थिक घसरण मोठ्या स्वरूपाची आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारताला ‘मोदी मेड डिजास्टर्स’मुळे त्रास होत असल्याची टीका केली आहे.

दरम्यान, या आधीच्या तिमाहीत विकास दर घटून 3.1 टक्के इतका होता आता तर तो शुन्याच्याही खाली गेला आहे. देशात करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा हा परिणाम मानला जात आहे.

नवी दिल्ली – देश आता महामंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचे आकडे अधिकृतपणे जाहीर झाले असून देशाचा विकास दर आता उणे 23.9 टक्के इतका झाला आहे. देशातील जीडीपी मध्ये झालेली ही घसरण अभुतपुर्व स्वरूपाची आहे. अशियातील अन्य देशांच्या तुलनेतही भारताची ही आर्थिक घसरण मोठ्या स्वरूपाची आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारताला ‘मोदी मेड डिजास्टर्स’मुळे त्रास होत असल्याची टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *