मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत. (Maharashtra Unlock 4 Guidelines)
राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही. तसेच हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो आणि सिनेमागृह अद्याप बंद राहणार आहेत.
‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद?
राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे
चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही (Maharashtra Unlock 4 Guidelines)